स्वाध्याय । पाठ १५. एक अपूर्व सोहळा । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | ek apurv sohala swadhyay 4thi


 स्वाध्याय । पाठ १५. एक अपूर्व सोहळा 





१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

( अ ) शिवरायांनी राजधानीसाठी निवड .......... केली.

(सिंहगडाची, रायगडाची, पन्हाळगडाची ) 

👉 शिवरायांनी राजधानीसाठी निवड रायगडाची केली.

(आ) शिवरायांचा राज्याभिषेक सन ......  मध्ये झाला.

(१६७४, १६७५,१६४७)

👉 शिवरायांचा राज्याभिषेक सन १६४७  मध्ये झाला.


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नदयांचे पाणी भरलेले होते ?

👉 सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे पाणी भरलेले होते.

(आ) शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला ?

👉 शिवरायांनी राज्याभिषेकापासून 'राज्याभिषेक शक' सुरू केला.


३. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले ?

👉 1. मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी.

 2. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला, हे स्वराज्य निर्माण झाले, हे जगाला कळावे.

3. हे स्वराज्य भक्कम करावे या हेतूंनी शिवरायांनी - राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले.

(आ) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली ? 

👉 1. रायगड हा मजबूत किल्ला होता. 

2. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. 

3. तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोईचे होते, म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली.

(इ) मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का वाहू लागले ?

👉 राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले, कारण- 

1. राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या तीस वर्षांच्या कष्टांचे चीज झाले होते.

2. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माउलीने मनी धरलेले स्वराज्यस्थापनेचे स्वप्न आज साकार झाले होते. 

त्यामुळे तिचा आनंद अश्रूंवाटे बाहेर पडला.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १४. गड आला, पण सिंह गेला । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय । पाठ १६. दक्षिणेतील मोहीम । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या