1 भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय 6वी इतिहास | bharatiy upkhand ani itihas swadhyay 6 vi

 1 भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय

भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय | Bharatiya upakhand ani itihas swadhyay 

1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(1) इतिहास म्हणजे काय ?

👉 इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटकांची सुसंगत मांडणी होय.

(2) मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो ?

👉 जिथे जगण्याच्या साधनांची उपलब्धता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो.

(3) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते ?

👉 डोंगराळ प्रदेशात राहणारे लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते.

(4) भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?

👉 हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होय.


2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(1) मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ?

👉 i) मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाजजीवन अवलंबून असते.

ii) मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घरबांधणी त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात.

(2) आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात ?

👉 आपण ज्या प्रदेशात राहतो जगण्याची साधने पुढील प्रमाणे आहेत.

i) हवामान

ii) पर्जन्यमान 

iii) शेतीतून मिळणारे उत्पादन

iv) वनस्पती

v) प्राणी

vi) जमिनीतील खनिजे

(3) 'भारतीय उपखंड' असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात ?

👉 अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला 'दक्षिण आशिया' असे म्हणतात. दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशालाच 'भारतीय उपखंड' असे म्हणतात


3. कारणे लिहा.

(1) इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे.

👉 मानवी समाजा ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो, त्या प्रदेशाची जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. पर्यावरणाचा  -हास झाल्यास गावे - नगरे उजाड होतात अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ट संबंध आहे म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे.

(2) लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते.

👉 इतिहासाच्या वाटचालीत अनेकदा पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे व अन्य काही भौगोलिक संकटे येतात. अशावेळी त्या प्रदेशातील  लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या  इतर साधनांची कमतरता भासते म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव सोडून जाणे भाग पडते.


4. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा.

👉 



5. पाठ्यपुस्तकातील भारत - प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.

(1) भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत ?

👉 भारताच्या उत्तरेकडे हिंदूकुश व हिमालय या पर्वतांच्या रांगा आहेत

(2) भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते ?

👉 भारताच्या उत्तरेकडून खैबर  व बोलण या खिंडीमधून येणारे व्यापारी मार्ग आहेत.

(3)  गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो ?

👉 गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांगलादेशात होतो.

(4) भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत ? 

👉 भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत.

(5) थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?

👉 थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे.


हे पण वाचा 👇

6 वी इतिहास व नागरिक शास्त्र संपूर्ण स्वाध्याय 

2 इतिहासाची साधने स्वाध्याय 6 वी इतिहास 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या