7 मौर्यकालीन भारत स्वाध्याय 6 वी इतिहास | mauryakalin bharat swadhyay 6vi itihas

 7 मौर्यकालीन भारत स्वाध्याय

7 मौर्यकालीन भारत स्वाध्याय  | mauryakalin bharat swadhyay

1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(1) सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या?

👉 सिकांदराचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या.

(2) बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले?

👉 बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने महेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले.

(3) मौर्य काळात कोणते व्यवसाय होते?

👉 मौर्य काळात हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातूकाम, मातीची भांडी बनवणं हे व्यवसाय होते.

(4) सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत?

👉 सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती आणि बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत.


२. सांगा पाहू.

(१) सत्रप

👉 सम्राट सिकंदर ने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ज्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या त्या अधिकाऱ्यांना सपत्र असे म्हटले जाईल.

(२) सुदर्शन

👉 सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी गुजरात राज्यातील जुनागडजवळ जे धरण बांधले त्या धरणाला सुदर्शन असे नाव दिले होते.

(३) 'देवानं पियो पियदसी'

👉 सम्राट अशोक ने आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे शिलालेख व स्तंभालेख कोरवले,  त्यात त्याने स्वतःचा उल्लेख देवानं पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी या शब्दांत केला आहे.

(४) अष्टपद

👉 मौर्य काळात बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते.


3. आठवा आणि लिहा.

(१) चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती.

👉 चंद्रगुप्ताने प्रथम मगध हे महाजनपद जिंकले. त्यानंतर अवंती व सौराष्ट्र जिंकले. पाठोपात अफगाणिस्तान, काबुल, कंदाहार व हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्यात जोडले.

(२) सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती.

👉 सम्राट अशोकाचे साम्राज्य वायव्येस अफगाणिस्तान व उत्तरेस नेपाळपासून ते दक्षिणेस कर्नाटक व आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्र पर्यंत पसरले होते.


4. जोड्या जुळवा.


👉




5. तुम्हांला काय वाटते?

(१) सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले.

👉 i) सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला.

ii) तरीही पंजाबपर्यंत पोहचण्यात सिकंदर यशस्वी झाला, मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या.

iii) सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले त्यामुळे सिकंदराला माघार घेणे भाग होते.

(२) ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत.

👉  ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नाव असे.

(३) सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.

👉 कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांसाठीची  दया हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.


6. तुमच्या शब्दांत वर्णन करा.

(१) सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे.

👉  प्रजेसाठी सुकसोई निर्माण करण्यावर भर दिला. त्यात त्यांनी माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध केली. अनेक रस्ते बांधले, सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या व विहिरी खोदल्या ही कामे सम्राट अशोकाने केली 

(२) मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने.

👉  i) नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव, समारंभ साजरे होत.

ii) त्यांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत.

iii) कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती, लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्‌धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात.

 iv) बुद्‌धिबळाला ‘अष्टपद’ असे नाव होते.


7. आज युआन श्वांगसारखे परदेशी प्रवासी तुम्हांला भेटले तर तुम्ही काय कराल ?

👉 युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो दोन वर्षे राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. यांसारखे प्रवासी मला भेटल्यास त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याकडे असणारे ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न मी करेन. त्याच्यासोबत राहून शक्य तितकी मदत त्याला करेन. त्यांच्या देशातील विविध प्रकारची माहिती जाणून घेऊन त्या माहितीचा मी संग्रह करेन.


हे पण वाचा 👇

6 जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय 6वी इतिहास

8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये स्वाध्याय 6वी इतिहास



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या