1 आपले समाजजीवन स्वाध्याय 6वी नागरिकशास्त्र | Aple samajajivan Swadhyay 6vi nagarikashastra

 1 आपले समाजजीवन स्वाध्याय  

आपले समाजजीवन स्वाध्याय  | Apale Samajajivan Swadhyay  

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 

1) समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला  नियमांची गरज वाटली.

2) माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो.

3) आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात.


2. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) आपल्या मूलभूत गरजा कोणत्या ?

👉 अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत.

2) आपल्याला कोणाचा सहवास आवडतो ?

👉 कुटुंबातील लोक, नातेवाईक, आणि मित्र - मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो.

3) समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते ?

👉 समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची, आपल्या कणागुणांचा विकास करण्याची, आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.


3. तुम्हाला काय वाटते ? दोन ते तीन वाक्यात लिहा.

1) समाज कसा तयार होतो ?

👉 स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले - मुली मिळून समाज तयार होत असतो. आपली कुटुंबे, विविध गट, संस्था, संघटना या सर्वांनी मिळून आपला समाज बनलेला असतो. लोकांमधील परस्पर संबंध व्यवहार व देवाणघेवाण यांचा समावेश समाजात होतो. समान उद्दिष्ट्ये साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेंव्हा समाज तयार होत असतो.

2) समाजात कायमस्वरुपी व्यवस्था का निर्माण करावी लागते ?

👉 समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या अनेक गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही.

3) माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते ?

👉 समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. समाजाच्या निर्मितीतील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, यामुळे माणसाला स्थैर्य मिळते.

4) समाजव्यवस्था अस्तित्वात नसतो तर कोणत्या अडचणी आल्या असत्या ?

👉 i) समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्य विषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो समाजव्यवस्था नसतील तर यात अडचण निर्माण झाली असती.

ii) समाजातील अनेक व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात समाज व्यवस्था नसती तर या गरजा  अपूर्ण राहिल्या असत्या.

iii) समाज व्यवस्था नसती तर आपल्या क्षमता कौशल्यांचा विकास झाला नसता.


4. पुढील प्रसंगी काय कराल ?

1) तुमच्या मित्राची / मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे.

👉 माझा मित्र किंवा मैत्रीण जर त्यांचे शालेय वस्तू घरी विसरले असतील तर त्या दिवसासाठी माझ्याकडे असणारी वस्तू दोघांनी मिळून वापरू. किंवा एखादी वस्तू माझ्याकडे जास्त असेल तर मी ती त्याला देईल.

2) रस्त्यात एखादी अंध / अपंग व्यक्ती भेटली.

👉 रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती मला भेटली तर मी त्या व्यक्तीला आवश्यक असणारी मदत करेल. जर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असेल अथवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास तिला आवश्यक ती मदत करेल त्या व्यक्तीकडे असणारे सामान हातात घेऊन त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत सोडेल.


हे पण वाचा 👇

2. समाजातील विविधता स्वाध्याय 

11. प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय 6वी इतिहास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या